Ad Code

Responsive Advertisement

जमिनीची धूप कमी करण्यासाठी काही महत्वपूर्ण उपाय योजना

जमिनीची धूप जास्त प्रमाणत होत असल्याने सेंद्रिय कारण सुद्धा काही प्रमाणात कमी होत आहे.त्यासाठी जमिनीचे धूप थांबविण्यासाठी करायचा काही उपाय योजना
मातीचे कण जमिनीपासून वेगळे होऊन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पावसाच्या पाण्याबरोबर किंवा वाऱ्याबरोबर वाहत जाणे म्हणजे जमिनीची धूप होणे होय.शेतात अयोग्य रानबांधणी, पाण्याचा अयोग्य वापर,शेतातील बांध फोडणे, पाणी मुरवण्याची व्यवस्था नसणे,जास्त उष्णता निर्माण होणे.उन्हाचा प्रखर ताव अशा अपधाव सुरक्षितपणे वाहून जाण्यासाठी व्यवस्था नसणे इत्यादींमुळे जमिनीची धूप होते.ती कमी करण्यासाठी पॅरा गवताची लागवड फायदेशीर ठरते.त्याचा उपयोग शेतकरी मित्र दुभत्या गुरांना हिरवा चारा म्हणून करतात. शिवाय जमिनीवर उसाचे ,गवताचे, हिरवळ खतांचे आच्छादन करून सुद्धा जमिनीची धूप थांबविले जातात.
◾उपाययोजना
▪️जमिनीवर पडणारे पाणी जास्तीत जास्त जमिनीत जिरविले जाईल किंवा शोषले जाईल व भूपृष्ठावरून वाहणाऱ्या अपधाव पाण्याचे प्रमाण कमी होईल अशी व्यवस्था करावी.
▪️पाण्याबरोबर वाहत येणाऱ्या गाळाचे स्थापन घडवून आणण्याची व्यवस्था करावी. पिकांची फेरपालट करून वेगवेगळ्या प्रकारची पिके आलटून-पालटून घ्यावीत.
▪️पट्टा पेर पद्धतीचा वापर करून सर्वत्र सलग एकच पीक न घेता वेगवेगळ्या प्रकारची पिके वेगवेगळ्या पट्ट्यांमधून घ्यावीत.
▪️शेतीसाठी करावयाच्या संपूर्ण मशागती, जसे नांगरणी, कुळवणी, पेरणी, कोळपणी इ. उताराच्या आडव्या व समपातळी रेषेत समांतर करावी.
▪️उताराच्या जमिनीची धूप थांबविण्यासाठी समपातळीतील बांधबंदिस्ती, ढाळीचे वरंबे , उताराला आडवे वाफे, पायऱ्यांचे मजगीकरण, नाला विनयन, तसेच समपातळीत चर खोदणे या उपाययोजना कराव्यात.
▪️धूपनियंत्रण करण्यासाठी भुईमूग, मटकी आणि कुळीथ ही पिके अत्यंत कार्यक्षम आहेत.
पुढे जर तुम्हांला अशीच माहिती पाहिजे असेल तर या
यूट्यूब चैनल माहिती प्रशिक्षण ला सबस्क्राईब करा.

फेसबुक पेज ला फॉलो करा.


टेलिग्राम गृपला जॉइन् व्हा.

जैविक निविष्ठा मार्गदर्शन केंद्र कु- हा, अमरावती.जैविक शेतकरी मित्र निखिल मधुकर तेटू +919529600161 / +917721881560

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या